भाजपा हळूहळू लोकशाही संपवण्याचे कटकारस्थान करत आहे.
काँग्रेस, महाविकास आघाडी, इंडिया आघाडीच्या नेत्यांना ईडीची दमदाटी करून जेलमध्ये टाकणे हाच भाजपचा अजेंडा आहे.
जनतेची गळचेपी करण्याचं भाजप सध्या काम करत आहे.सोलापूर लोकसभेचे उमेदवार प्रणिती शिंदे यांचा आरोप..
चारशे पार ही भाजपची खेळी आहे त्यांना सुद्धा माहिती आहे की 100 200 च्या वर जाणार नाही चारशे पारचा जर विश्वास असता तर आम आदमीचे मुख्यमंत्री केजरीवालाना का अटक केली तसेच काँग्रेसची खाती एका रात्रीत शील केली अजूनही त्यांना भीती आहे म्हणून हे प्रकार करतात आमदार खासदारांची खरेदी विक्री ही सुरू आहे असाही आरोप प्रणिती शिंदे यांनी केला.
सुप्रीम कोर्टाचे वारे भाजपच्या विरोधात वहायला लागले आहे….. दोन-तीन निर्णय आता भाजपच्या विरोधात गेले आहेत