*आषाढी पालखी सोहळ्यातील तीन दिड्यांना श्री. विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार;*

सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती.

पंढरपूर (ता.11) – पंढरीची पायीवारी ही महाराष्ट्राची प्राचीन, अध्यात्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. या पायीवारी सोहळ्याची परंपरा अखंड राहण्यासाठी या परंपरेचे रक्षण व संवर्धन करणे हे आपल्या सर्व वारकरी वैष्णवांचे सर्व प्रथम कर्तव्य आहे. हा पायीवारी सोहळा स्वच्छ, निरोगी व निरामय राखण्यासाठी या सोहळ्यातून समाजाला सामाजिक, पर्यावरण, वृक्ष संवर्धन, प्लॅस्टिक मुक्ती, व्यसनमुक्ती, स्त्रीभ्रूण हत्या यासारखे सामाजिक विषयांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे.

आषाढी यात्रेतील सर्व सोहळ्यातील बऱ्याच दिंड्या हे कार्य करत आहेत, त्यांच्या कार्याचा उचित असा सन्मान व्हावा. त्याच प्रमाणे इतर दिंड्यानीही त्याचा आदर्श घेवून या “निर्मल वारी, हरीत वारी अभियान” मध्ये सहभाग घ्यावा. या जाणिवेतून, श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती मार्फत आषाढी यात्रा कालावधीत “श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार” सन 2018 पासून सुरू करण्यात आला आहे.

  1. आषाढी पालखी सोहळ्यातील पहिल्या तीन क्रमांकाच्या दिंड्यांना आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व रक्कमेचा (प्रथम रू.1 लक्ष, द्वितीय रू.75 हजार व तृतीय रू.50 हजार) धनादेश देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्यासाठी ॲड.माधवी निगडे, ह.भ.प.प्रकाश जवंजाळ, वृक्षमित्र ह.भ.प.शिवाजीराव मोरे या मंदिर समितीच्या तीन सदस्याची समिती गठीत करण्यात आली असल्याचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगीतले.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here